Maharashtra SSC Result 2023 : राज्याचा 10 वीचा निकाल 93.83 टक्के, यंदा कुणी मारली बाजी?
राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे देखील लक्ष लागले होते. दरम्यान आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांने घेतलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असल्याचे पाहायला मिळाले तर राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. राज्यात नागपूर विभागाचा सर्वात कमी 92.49% तर कोकण विभागाने 98.11% मार्क मिळवत अव्वल स्थान पटकावलं आहे.
विभाग निहाय निकाल
पुणे 95.64%
मुंबई 93.66%
औरंगाबाद 93.23%
नाशिक 92.22%
कोल्हापूर 96.73%
अमरावती 93.22%
लातूर 92.66%
नागपूर 92.05%
कोकण 98. 11%
Maharashtra SSC Result 2023 : राज्याचा 10 वीचा निकाल 93.83 टक्के, यंदा कुणी मारली बाजी?By AIN News TV| 542 views
“आमचं ठरलंय, अजित पवार यांचं सूचक विधान; “आगामी निवडणूका आम्ही…”
आगामी निवडणुकांवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. तुम्ही काळजी करू नका, “आमचं ठरलंय, आगामी निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढवणार आहोत”, असं अजित पवार म्हणाले आहेत. “राष्ट्रवादी काँग्रेमध्ये विलास लांडे हे आमदार होते, त्यांना मी महापौर केलं होतं. खासदारकीची उमेदवारी दिली होती, मात्र त्यांना अपयश आलं होतं. आता त्यांनी काही गोळाबेरीज केली असेल, आता तिथे अमोल कोल्हे आहेत. कोल्हे काय म्हणाले मी ऐकल आहे. हा आमचा घरातला प्रश्न. ४८ जागा कुठल्या पक्षाला जाणार ते आधी ठरेल. उमेदवार तोडीस तोड लढेल का याची चाचपणी व्हावी अशी मागणी आहे. अजून एक वर्ष, आम्ही आधी तयारीला लागलो”, असं अजित पवार म्हणाले.
“आमचं ठरलंय, अजित पवार यांचं सूचक विधान; “आगामी निवडणूका आम्ही…”By AIN News TV| 96 views
काँग्रेसच्या आढावा बैठकीत काय चर्चा झाली? अशोक चव्हाण यांनी माहिती देत म्हणाले…
काँग्रेसची लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण उपस्थित होते.या बैठकीत नेमकं कशावर चर्चा झाली यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी माहिती दिली आहे. “जिथे ज्याची ताकद त्यालाच जागा मिळावी ही काँग्रेसची भूमिका असल्याचं” अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. तसेच जनतेचे मुद्दे घेऊन काँग्रेस निवडणुकांना सामोरं जाणार आहे, आणि कुठल्या जागांवर दावा करायचा याबाबत काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.
काँग्रेसच्या आढावा बैठकीत काय चर्चा झाली? अशोक चव्हाण यांनी माहिती देत म्हणाले…By AIN News TV| 90 views
३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा : रायगडावरून देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात येणार, तसेच प्रतापगड प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आणि शिवसृष्टीसाठी 350 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. दरम्यान, यावेळी भाषण करत असताना छत्रपती शिवरायांच्या राष्ट्रीय स्मारकाबद्दल मोठी घोषणा केली आहे. दिल्ली येथे शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी लवकर मुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांना भेटणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले तर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांची रायगडावर शिवसृष्टी उभारण्याची मागणी पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा : रायगडावरून देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणाBy AIN News TV| 61 views
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सिंहासन लवकरच हलणार”, संजय राऊत यांचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांना भेटायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जात असतील तर चुकीचं काय? राज्यात काही समस्या असेल आणि त्यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार हे मुख्यमंत्री शिंदे यांना भेटायला गेले असतील तर चुकीचं काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. मीडियाने सत्य समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ काढला तर अशा पद्धतीने कुणी कुणाकडे जायला नको. विधीमंडळात अनेक आमदार एकमेकांना भेटत असतात. त्यामुळे खळबळ माजते का? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एखादा नेता मुख्यमंत्र्यांना भेटला तर चुकीचं काय? आम्ही राज्यपालांना, मुख्यमंत्र्यांना निवेदन देत असतो. त्यांना भेटत असतो. त्यात चुकीचं काय? काही काळ का होईना मुख्यमंत्री सत्तेवर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना डिसमिस केलं. तरीही ते खुर्चीत आहेत. जोपर्यंत खुर्चीत आहेत तोपर्यंत त्यांच्याकडे निवेदनं दिली पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सिंहासन लवकरच हलणार”, संजय राऊत यांचा दावाBy AIN News TV| 90 views
कोस्टल रोड ते शिवसृष्टी, रायगडावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या 3 घोषणा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं. यावेळी भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच प्रताप गडाच्या संवर्धनासाठी प्रतापगड प्राधिकरणाची घोषणाही करण्यात आली. या प्राधिकरणाचे अध्यक्ष उदयनराजे भोसले असतील. तिसरी म्हणजे शिवसृष्टीसाठी 350 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
कोस्टल रोड ते शिवसृष्टी, रायगडावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या 3 घोषणाBy AIN News TV| 80 views
‘… लाथ मारून शिवसेनेचा भगवा फडकणार’, संजय राऊत आक्रमक होत नेमकं काय म्हणाले?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची घेतलेली भेट, महाविकास आघाडीच्या जागा वाटप, रायगडावर होत असलेला शिवराज्याभिषेक सोहळा आणि शिवसेनेचं महाअधिवेशन यांवर संजय राऊत यांनी भाष्य केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकसभा आणि विधानसभेचं जागा वाटप सुरळीतपणे पार पडेल. कुणाला चिंता वाटण्याचं कारण नाही. आनंदाच्या उकाळ्या फुटण्याचं कारण नाही. प्रत्येक जागेचा ऊहापोह केला जाईल. कोण जिंकू शकतं. एकमेकांना कशी मदत करायची त्यावर चर्चा होईल. त्यानंतर विधानसभेचं जागा वाटपही त्याच पद्धतीने होईल. आमच्यात कोणतेही मतभेद होणार नाही. वज्रमूठ कायम राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं. तर शिंदे सरकारला बेकायदेशी असल्याचे म्हणत बेकायदेशीर सरकारला लाथ मारणं हा आमचा अजेंडा आहे. बेईमानी करणाऱ्यांना नेस्तनाबूत करणं, शिवसेना पुन्हा शिखरावर नेणं हा आमचा मुख्य कार्यक्रम आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांचं सिंहासन लवकरच हलणार आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
‘… लाथ मारून शिवसेनेचा भगवा फडकणार’, संजय राऊत आक्रमक होत नेमकं काय म्हणाले?By AIN News TV| 56 views
पवार-शिंदे भेटीवर अजित पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले, यामध्ये गैर काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या भेटीवर विरोधी पक्षनेते अजित वार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्र्यांना पवारांनी भेटण्यात गैर काय ?”, असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.तसेच शरद पवार मुख्यमंत्री शिंदे यांना का भेटले हा काही चर्चेचा विषय नाही. या भेटीमागे राजकीय अर्थ काढू नये असं अजित पवार म्हणाले आहेत.
पवार-शिंदे भेटीवर अजित पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले, यामध्ये गैर काय?By AIN News TV| 60 views
पंकजा मुंडे यांच्या प्रश्नावर, अनुराग ठाकूर म्हणतात, “चलो, धन्यवाद”
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाच्या भाषणामध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. “मी भाजपची आहे, पण भाजप माझा नाही”, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या याच वक्तव्याचे आता वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ काढले जात असून, यावर राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलं आहे. पंकजाताई भाजप माझ्या पाठिशी आहे, असंच म्हणाल्या, असं बावनकुळे म्हणाले. तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पंकजा मुंडे यांच्यावर प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे. “चला धन्यावाद”, असं म्हणत त्यांनी यावर बोलण्याचं टाळलं आहे.
पंकजा मुंडे यांच्या प्रश्नावर, अनुराग ठाकूर म्हणतात, “चलो, धन्यवाद”By AIN News TV| 50 views
काँग्रेस आमदाराकडून रावसाहेब दानवेंचं तोंडभरून कौतुक, म्हणाला, “जालन्यात अनेक विकास योजना…”
काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्याकडून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं कौतुक करण्यात आलं आहे. जालन्यात अनेक विकास योजना येण्यात दानवे यांचं योगदान असल्याचं गोरंट्याल म्हणाले आहेत. जालनामध्ये छत्रपती संभाजी महाराज उद्यानात १५० फुट उंच राष्ट्रीय ध्वज आणि मोती तलाव चौपाटीवर रेल्वे इंजिन बसविण्याचा भुमिपुजन सोहळा दानवे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी भाषण करताना कैलास गोरंट्याल यांनी रावसाहेब दानवे यांचं कौतुक केलं आहे. “जालना शहरात जी विकास कामे झाली ती फक्त दानवे यांच्यामुळे झाली आणि यासाठी रावसाहेब दानवे यांचे नाव घेतले पाहिजे”, असं कैलास गोरंट्याल म्हणाले.
काँग्रेस आमदाराकडून रावसाहेब दानवेंचं तोंडभरून कौतुक, म्हणाला, “जालन्यात अनेक विकास योजना…”By AIN News TV| 58 views
आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे अॅक्शनमोडमध्ये, केला ‘हा’ मास्टरप्लान
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब, खासदार विनायक राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. या तीन नेत्यांना पराभूत करण्यासाठी श्रीकांत शिंदे मुंबईभर शिवसेना शाखा संपर्क अभियान राबवत आहेत. तसेच या तिघांच्या मतदारसंघामध्ये शाखांच्यामाध्यमातून शिवसेनेचे जास्तीत जास्त कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या तिघांच्या मतदारसंघात जाऊन प्रचार करण्याची रणनीती शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आखली आहे. त्याची सूत्रे स्वत: श्रीकांत शिंदे यांनी हाती घेतली आहेत. त्यामुळे या तिन्ही नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.
आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे अॅक्शनमोडमध्ये, केला ‘हा’ मास्टरप्लानBy AIN News TV| 15 views
शिंदे गट भाजपामध्ये विलीन होणार? राष्ट्रवादी नेत्याचं मोठं वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीतील गेलेल्यआ नेत्यांवरून आणि आगामी निवडणूकीवरून मनमोकळा गप्पा मारताना शिंदे गट आणि भाजपवर टीका केली. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आयाराम आणि गयाराम यांची भाजपमध्ये सध्या जोरदार प्रवेश होत आहेत. त्यावरून टीका करताना त्यंनी शिंदे गटाबाबत ही मोठा दावा केला. त्यांनी अनेक लोकं राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे तेथेच निष्ठावंतांना आणि पक्ष प्रवेश केलेल्यांना कुठ बसवायचं असा पेच निर्माण झाला आहे. तर नुकताच शिवसेनेतून फुटलेला आणि भाजपच्या सोबत असलेला शिंदे गट त्यांच्यात कधी म्हणता म्हणता भाजपवासी होतील हे सांगता येणार नाही. त्यामुळं भाजपतं जी लोकं गेलीत या सगळ्यांच्या ओझ्याखाली निष्ठावंत मागे ढकलली गेले आहेत, हे पक्क असल्याचं ते म्हणालेत.
शिंदे गट भाजपामध्ये विलीन होणार? राष्ट्रवादी नेत्याचं मोठं वक्तव्यBy AIN News TV| 13 views
खासदार कीर्तीकर यांच्यावर कोणाची खरमरीत टीका म्हणाला, ‘आमच्याकडं जेष्ठ, पण…; दबाव असू शकतो?’
शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांनी त्यांच्या सापत्न वागणूक या आधीच्या भूमिकेवरून यू-टर्न घेतला आहे. एनडीएमध्ये आम्हाला सापत्न वागणूक मिळत आहे, असं कीर्तीकर म्हणाले होते. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील अंतर्गत धुसफुस समोर आली होती. आता मात्र ते सारवासारव करताना दिसत आहेत. तसेच या विशयावर पडदा टाकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. यावरून आता किर्तीकर यांनी, भाजपकडून सापत्न वागणूक मिळतेय असं मी बोलोच नाही, माझ्या तोंडात ते टाकलं गेलं असं ते म्हणालेत यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका करताना, ते आमच्याकडे जेष्ठ होते. मात्र तिकडे गेल्यावर त्यांचा काय स्टेटस आहे आता माहित नाही. तर त्यांनी आपल्याला सापत्न वागणूक दिली जाते असेच म्हटलं होतं. हवं तर आणखी एकदा तपासावं. तर त्यांनी घुमजाव केल्याचं ऐकलं. कदाचित त्यांच्यावर दबाव असावा. त्यामुळे त्यांनी घुमजाव केलं असेल.
खासदार कीर्तीकर यांच्यावर कोणाची खरमरीत टीका म्हणाला, ‘आमच्याकडं जेष्ठ, पण…; दबाव असू शकतो?’By AIN News TV| 17 views
“मी पक्षाची, पण पक्षाची मी नाही”, पंकजा मुंडे यांचं मोठं विधान
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने दिल्लीत आज राष्ट्रीय समाज पक्षाकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी सूचक विधान केलं. “आमचाही नेता चहा विकता विकता बनला की प्रधानमंत्री. माझंही लक्ष राष्ट्रीय समाज पक्षावर आहे. हा पक्ष माझ्या भावाचा आहे. जानकर म्हणाले की ताईंच्या पक्षानं हे केलं. भाजप माझा थोडी आहे. मी भाजपात आहे. भाजप पक्ष मोठा आहे. मुंडे साहेब होते तेव्हा छोट्या-छोट्या माणसांना घेऊन बनवलं. तेव्हा पक्षाने सत्तेचं तोंड पाहिलं”, असं पंकजा आपल्या भाषणात म्हणाल्या. तसेच “मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईल. महादेव जानकर जातील मेंढ्या वळायला. अजून काय आहे”, असा इशाराच पंकजा मुंडे यांनी भाजपला केला आहे.
“मी पक्षाची, पण पक्षाची मी नाही”, पंकजा मुंडे यांचं मोठं विधानBy AIN News TV| 11 views
“मातोश्रीने नितेश राणे यांचे हट्ट पुरवले”, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी पुन्हा एकदा भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. “नितेश राणे यांना जनाची नाही, तरी मनाची लाज वाटू दे. स्वत:चं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघाचं वाकून अशी सवय नितेश राणे यांना आहे. नितेश राणे यांच्या अंगावरचे कपडेसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या आशीवार्दाने मिळाले आहेत.तुमचे लाड,हट्ट हे सुद्धा मातोश्रीने पुरवले आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांच्यापाठी ठाकरे गट आहे. कपटीपणामुळे राणे कुटुंबाला भाजपकडून तिकीट मिळणार नाही, त्यामुळे बॅग भरायची वेळ आली आहे”, असं शरद कोळी म्हणाले.
“मातोश्रीने नितेश राणे यांचे हट्ट पुरवले”, ठाकरे गटाच्या नेत्याची टीकाBy AIN News TV| 14 views
मुंबईकरांसाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वाचा, दुसऱ्या बोगद्याच्या खननाचं काम पूर्ण
कोस्टल रोडचं वरळी ते मरीन ड्राईव्ह या पहिल्या टप्प्याचं काम नोव्हेंबर अखेरीला होणार पूर्ण, डिसेंबरपासून हा मार्ग दोन्ही दिशांनी वाहतुकीसाठी खुला केला जाणा
मुंबईकरांसाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वाचा, दुसऱ्या बोगद्याच्या खननाचं काम पूर्णBy AIN News TV| 12 views
अंधारे प्रकरणात शिवसेना नेत्याला क्लीनचीट, राऊत यांचा फडणवीस यांच्यावर पलटवार; ‘कसलं प्रत्यक्ष
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. संजय शिरसाट यांचे वादग्रस्त विधान करताना अंधारे हजर नव्हते, त्यामुळे गुन्हा घडत नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी, अंधारे यांचा अवमान केल्याप्रकरणी संजय शिरसाट यांना क्लीनचिट देण्यात आली आहे. सरकार त्यांचं आहे. गृहखातं त्यांचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुषमा अंधारे प्रकरणावर बोललं पाहिजे. जंतरमंतरवर प्रत्यक्ष मुली समोर येत आंदोलन करत आहेत. तरीही त्यांची तक्रार दाखल केली जात नाही. कसलं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष? कायदा तुमच्या कोठीवर नाचत आहे. कायद्यावर कोणी तरी मालकी हक्क सांगत आहे. आम्ही लिहू तोच एफआयआर. आम्ही लिहू तोच गुन्हा अशा पद्धतीचं कारभार राज्यात सुरू आहे. पण हे औटघटकेचं आहे. सुषमा अंधारे या वरिष्ठ नेत्या आहेत. सुशिक्षित महिला आहेत. त्यांच्यावर केलेली विधानं ही अत्यंत गंभीर आहेत. मात्र ती कायद्याला गंभीर वाटतं नाहीत. त्यामुळे सगळंच गंभार आहे असं म्हणावं लागेल असेही राऊत यांनी म्हटलं आहे.
अंधारे प्रकरणात शिवसेना नेत्याला क्लीनचीट, राऊत यांचा फडणवीस यांच्यावर पलटवार; ‘कसलं प्रत्यक्षBy AIN News TV| 25 views
महिला कुस्तीपटू आंदोलनावरून अजित पवार यांचा केंद्राला सवाल? म्हणाले, ‘चर्चा करून तोडगा का…?’
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी 23 एप्रिलपासून कुस्तीपटू आंदोलन करत आहे. तर नव्या संसद भवनाचा उद्घाटना दिवशीच त्यांचे हे आंदोलन चिरडून टाकण्याचं काम दिल्ली पोलीस करताना दिसले. याप्रकारानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावर भाष्य केलं. लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी न्याय मागत असलेल्या महिला कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी दिलेली वागणूक अत्यंत वेदनादायक असल्याचं पवार यांनी ट्वीट करत म्हटलं होतं. त्यानंतर आता या विषयावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे. तसेच त्या महिला कुस्तीपटूंची मागणी काय आहे हे जाणून घ्यायला हवं होतं. त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती. त्यांच्या आरोपात काही तथ्य आहे का नाही हे तपासायला हवं होतं. मात्र तथ्य असेल तर निर्णय घ्या आणि नसेल तर त्या खेडाळूंची समजूत काढा. पण अशा पद्धतीने त्यांच्याबरोबर वागलं जात आहे. संविधानाने दिलेल्या हक्कांचा वापर करूनही जर न्याय मिळत नसल्याने त्यांनी आंदोलन केलं आहे. त्यांना हा शेवटचा मार्ग अवलंबला असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
महिला कुस्तीपटू आंदोलनावरून अजित पवार यांचा केंद्राला सवाल? म्हणाले, ‘चर्चा करून तोडगा का…?’By AIN News TV| 25 views
‘उबाठा तर विलीन होणारच!’ भाजप नेत्यानं तारीख सांगत केला राऊत यांच्यावर दावा म्हणाल ‘100 कोटींची ऑफर’
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्यात जोरदार खडाजंगी होत आहे. आज ही राऊत यांची पत्रकार परिषद झाली. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधत टीका केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेलं वक्तव्य 100 टक्के खरे असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून नितेश राणे यांनी पुन्हा एकदा राऊत यांच्यावर टीका केली आहे. तसेच येत्या 19 जूनला उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उबाठा शिवसेना विलीन करणार असा दावा राणे यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे गट हे अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होतोय असेही म्हटलं आहे. तर राऊत यांच्यांवर आरोप करताना त्यांनी 200 कोटींसाठी महाविकास आघाडीसाठी पुढाकार घेतला. तर आता ठाकरे गट राष्ट्रवादीत विलिनकरण्यासाठी त्यांना 100 कोटींची ऑफर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरेंना शिवसेना नाव वापरण्याचा अधिकार नाही असेही ते म्हणालेत.
‘उबाठा तर विलीन होणारच!’ भाजप नेत्यानं तारीख सांगत केला राऊत यांच्यावर दावा म्हणाल ‘100 कोटींची ऑफर’By AIN News TV| 12 views
“…ही राजकारणाची जागा नाही”, माजी मंत्र्याने टोचले रोहित पवार अन् राम शिंदेंचे कान
माजी मंत्री अण्णा डांगे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरून दोन्ही आमदारांचे कान टोचले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्या आरोप प्रत्यारोपवरून अण्णा डांगे यांनी दिली प्रतिक्रिया दिली आहे.उत्सवाच्या बाबतीत आरोप-प्रत्यारोप करणे योग्य नाही. उत्सव कसा होईल, देवाचे महत्त्व कसे वाढेल, याचा विचार केला पाहिजे. आपापसातली मतभेदासाठी खूप मैदान आहे. हे वेडं वाकडं बोलण्याचं ठिकाण नाही. हे चांगलं बोलायचं ठिकाण आहे.आपला शत्रू असला तरी विचारपूस केली पाहिजे, राजकीय आरोप टाळावेत. कामाने श्रेय वाढत काम केले पाहिजे, असे आण्णा डांगे म्हणाले.
“…ही राजकारणाची जागा नाही”, माजी मंत्र्याने टोचले रोहित पवार अन् राम शिंदेंचे कानBy AIN News TV| 11 views
“शोधू कुठे बाळूभाऊ तुम्हाला, काळजात आग लागली”, धानोरकर यांच्या कार्यकर्त्याकडून शोक व्यक्त
काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानरकर यांचं निधन झालं. वयाच्या 48 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्याने धानोरकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.आज त्यांच्या राहत्या घरी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक कार्यकर्ते आणि राज्यातले राजकीय नेते आले आहेत. यावेळी बाळू धानोरकर यांच्या एका कार्यकर्त्याने कवीतेतून त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. शोधू कुठे बाळूभाऊ, काळजात आग लागली, या चाल म्हणत कवीने कविता गायली. चक्रधर दत्ता तोगरे, यांनी बाळू धानोरकर यांच्यावर गीत गायलं.
“शोधू कुठे बाळूभाऊ तुम्हाला, काळजात आग लागली”, धानोरकर यांच्या कार्यकर्त्याकडून शोक व्यक्तBy AIN News TV| 53 views
शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते भाजपमध्ये जाणार? संजय राऊत यांच्या विधानावर, भरत गोगावले म्हणतात…
संजय राऊत वारंवार लोकसभेच्या जागेवरून शिवसेनेला डिवचण्याचं काम करत आहेत. यावरून आता शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांचा ज्योतिष कधी खरा ठरला आहे का? आत्तापर्यंत जेवढे त्यांनी सांगितले ते सगळं खोटं ठरलं आहे.ते बोलतात त्याचे उलट होतं. त्याची काळजी करायची गरज नाही.आम्हाला भाजपमध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही. काही असेल तर आम्ही वरिष्ठांबरोबर चर्चा करून बघू. त्यांनी बोलत राहो आम्ही आमचं काम करत राहू, असं भरत गोगावले म्हणाले.तसेच अंबादास दानवे यांनी संदिपान भुमरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे काही गंभीर आरोप केले आहेत. यावरही भरत गोगावले यांनी प्रतक्रिया दिली आहे. अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत ते विरोधी पक्षनेते मात्र त्यांनी ठोस पुरावे सादर करावे, पुरावे आले तर त्याच्यावरती ॲक्शन करता येईल.
शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते भाजपमध्ये जाणार? संजय राऊत यांच्या विधानावर, भरत गोगावले म्हणतात…By AIN News TV| 17 views
“भाजपने कितीही आटापिटा केला तरी…”, राऊत यांची खरमरीत टीका
भाजपवर टीका करताना त्यांनी सध्या जे भाजपचं सुरू आहे ते दुर्दैवी आहे. भाजपकडे केंद्र आणि राज्य शासन असतानाही केंद्रीय मंत्र्यांना गावागावात गल्ली गल्लीत जाऊन आपलं काम सांगावं लागत आहे. पण लोकांना आता भाजपचा चेहरा कळला आहे. भाजपने अन्यायकारक निर्णय घेतले, कितीही अध्यादेश बदलले त्याचा फायदा होणार नाही. जे कर्नाटकात झाल ते राजस्थान, महाराष्ट्रात होणार आहे. त्यामुळे आता भाजपला पराभवाची धूळ चाखावीच लागणार असल्याचं ते म्हणालेत.
“भाजपने कितीही आटापिटा केला तरी…”, राऊत यांची खरमरीत टीकाBy AIN News TV| 13 views
…नाहीतर गौतमी पाटील हिनं बिहारला जावं, छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनं पुन्हा डिवचलं अन् दिलं चॅलेंज
“महाराष्ट्र चांगला घडवायचा असेल तर महाराष्ट्राची संस्कृती राखली पाहिजे. गौतमी पाटील यांनी पाटील आडनाव लावावे. त्याला माझा विरोध नाही तर त्या ज्या पद्धतीने अदा करतात, त्याला माझा विरोध आहे. पाटील आडनाव लावण्याचा ज्याला त्याला पूर्ण अधिकार आहे. गौतमी पाटील यांना आडनावरून कोणी विरोध करू नये, आपले अधिकार आपण ठरू शकतो”, असं महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे म्हणाला. मी गौतमी पाटील यांना ओपन चॅलेंज करतो, त्यांनी आमचा मुसंडी सिनेमा पाहावा, तेव्हा तुम्हाला कळेल महाराष्ट्राची संस्कृती काय आहे. गौतमी पाटील यांना बोलण्यात काही अर्थ राहिला नाही, बोलून काही त्या प्रतिसाद देत नाही. आता 9 जून नंतर मी त्यांची भेट घेणार आहे, असं घनश्यामने सांगितलं. तर आता ताईला समजून सांगणे गरजेचे आहे, नाहीतर मी ताईला ओपन चॅलेंज देतो त्यांनी बिहारमध्ये जावं. तुम्ही बदल करणार नसाल तर महाराष्ट्रात तुम्हाला थारा नाही. गौतमी पाटील यांची महाराष्ट्रात जास्त दिवस हवा राहणार नाही. कारण तुम्ही पोरांना वेगळ्या वळणाला लावत आहे, वाईट वळण लावत आहे”, असा आरोप घनश्यामने केला. 9 तारखेनंतर मी गौतमी पाटील यांची भेट घेणार आहे. महाराष्ट्राच्या वतीने त्यांना समजून सांगणार आहे. त्यांना बदल करायला सांगणार आहे. महाराष्ट्र चांगला घडवायचा असेल तर महाराष्ट्राची संस्कृती एक राहिली पाहिजे, असं देखील तो यावेळी म्हणाला.
…नाहीतर गौतमी पाटील हिनं बिहारला जावं, छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनं पुन्हा डिवचलं अन् दिलं चॅलेंजBy AIN News TV| 22 views
ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर निशाना साधला आहे
नोटबंदी, कर्नाटकात हार, दिल्लीत पदकवीर खेळाडूंचे सुरू असलेले आंदोलन यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर निशाना साधला आहे. भाजपवर टीका करताना त्यांनी सध्या जे भाजपचं सुरू आहे ते दुर्दैवी आहे. भाजपकडे केंद्र आणि राज्य शासन असतानाही केंद्रीय मंत्र्यांना गावागावात गल्ली गल्लीत जाऊन आपलं काम सांगावं लागत आहे. पण लोकांना आता भाजपचा चेहरा कळला आहे. भाजपने अन्यायकारक निर्णय घेतले, कितीही अध्यादेश बदलले त्याचा फायदा होणार नाही. जे कर्नाटकात झाल ते राजस्थान, महाराष्ट्रात होणार आहे. त्यामुळे आता भाजपला पराभवाची धूळ चाखावीच लागणार असल्याचं ते म्हणालेत.
ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर निशाना साधला आहेBy AIN News TV| 16 views
‘खरेदीच नाही आणि म्हणे भ्रष्टाचार झाला?’ विरोधी पक्ष नेत्यावर कॅबिनेट मंत्र्याचा घणाघात
दोन दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारमधील सहकार मंत्री अतुल सावे यांच्यावर कमिशनवरून राष्ट्रवादी आमदाराने आरोप केले होते. त्यानंतर आता आणखी एका मंत्र्यावर विरोधकांनी गंभीर आरोप खुद्द विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्यावर टॅब खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याला आता भुमरे यांनी उत्तर दिलं आहे. तसेच जर टॅब खरेदी झालीच नाही तर भ्रष्टाचार झाला कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच अंबादास दानवे हे विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेते पदी अशा जबाबदारीच्या पहावर आहेत. त्यामुळे त्यांनी किमान माहिती घेऊन असे आरोप करावेत. तर हा आरोप काही खरा नाही असा टोला लगावला आहे.
‘खरेदीच नाही आणि म्हणे भ्रष्टाचार झाला?’ विरोधी पक्ष नेत्यावर कॅबिनेट मंत्र्याचा घणाघातBy AIN News TV| 10 views
“संजय राऊत विसरले की ते 5 वर्ष एनडीचा भाग होते”, नितेश राणे भडकले
“मोदी सरकारची 9 वर्षे म्हणजे, नाकी नऊ आणणारी” असे वक्तव्य संजय राऊत केले. यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कदाचित संजय राऊत विसरले असतील 2014 पासून ते 2019 पासून ते एनडीए सरकारचे भाग होते. एनडीएच्या सरकारमध्ये त्यांचेमंत्री देखील होते. संजय राऊत आणि त्यांच्या मालकाचे लाड तेव्हा पुरवले जात होते. आदित्य ठाकरे यांची आमदारकी पण मोदी साहेबांमुळेच मिळाली. 25-30 वर्षे असलेली युती उद्धव ठाकरे यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे तुटली. ठाकरे गट राष्ट्रवादीत विलीन होण्याची तयारी झाली असल्याचे मी पुन्हा बोलतोय.2024 ची निवडणूक आदित्य ठाकरे घड्याळ चिन्हावर लढणार का अशी स्थिती निर्माण झाली आहे”, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
“संजय राऊत विसरले की ते 5 वर्ष एनडीचा भाग होते”, नितेश राणे भडकलेBy AIN News TV| 11 views
नवनीत राणा यांना न्यायालयात जायला उशिर, मग न्यायाधीश म्हणाले…
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालिसा पठण प्रकरणावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. या सदर प्रकरणात आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी नवनीत राणा कोर्टासमोर उशिरा हजर राहिल्याने न्यायाधीशांनी त्यांना सुनावलं. न्यायालयाथ उशिरा पोहोचल्याने न्यायाधीशांनी झापल्याचं नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी नवनीत राणा यांनी महिला म्हणून कोर्टात येणं याचं दु:खं वाटतं, असं म्हणाल्या.
नवनीत राणा यांना न्यायालयात जायला उशिर, मग न्यायाधीश म्हणाले…By AIN News TV| 14 views
त्यावेळी बाळू धानोरकर यांनी मला साथ दिली होती”, विजय वडेट्टीवार यांच्याकडून आठवणींना उजाळा
चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचा वयाच्या ४७ व्या वर्षी मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. बाळू धानोरकर यांच्या मृत्यूवर विजय वड्डेटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्रातून काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून ते निवडून आले होते. एक लढवय्या नेता म्हणून त्यांची ओळख आहे. या नेत्याला गमावण्याचा दु:ख आम्हाला आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी बाळू धानोरकरांची आठवणींना उजाळा दिला आहे.
त्यावेळी बाळू धानोरकर यांनी मला साथ दिली होती”, विजय वडेट्टीवार यांच्याकडून आठवणींना उजाळाBy AIN News TV| 10 views
… तर कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण काय? राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
लावणी नृत्यांगना म्हणून गौतमी पाटील हिची क्रेझ कायम आहे. तरूणांपासून ते वरिष्ठांपर्यंत गौतमीने आपल्या नृत्याची सगळ्यांनाच भुरळ घातली आहे. अशातच गौतमी पाटीलच्या अडनावावरून वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर तिने आपले नाव बदलावे अशी मागणीही केली गेली. यासह तिच्या कार्यक्रमांना बंदी घालण्याची मागणी होतेय. गौतमी पाटील गरीब परिस्थितीमधून पुढे आलीय. तिला संपवू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी समाजातील ठेकेदारांना चांगलंच फटकारलं आहे. लावणी नृत्यांगना म्हणून गौतमी पाटील हिची क्रेझ निर्माण झाली आहे. परंतु कला क्षेत्रामध्ये मिळत असलेले यश कधीच कायमस्वरुपी नसते. आज तिच्यासंदर्भात जे होत आहे, ते प्रत्येक कलाकाराच्या बाबती होत असतं. आज गौतमी पाटील यशाच्या शिखरावर आहे. कलाकार म्हणून ती तिची कला सादर करत आहे. तो तिचा व्यवसाय आहे. यामुळे तिला अकारण ट्रोल करण्यापेक्षा तिची कुचंबणा होऊ नये, अशी काळजी घ्या, असे आवाहन अमोल कोल्हे यांनी केले. पुढे ते म्हणाले की, गौतमीच्या यशाची ती फेज आहे, ती पचवण्यासाठी समाजाने तिला मदत करावी. तिचे वय खूप लहान आहे. ग्रामीण भागातील तरुण आज तिच्यावर फिदा झाले आहेत. तिच्या कार्यक्रमांना प्रंचड गर्दी होतेय. परंतु ज्यावेळी गौतमी परिस्थीत हलाखीची होती तेव्हा दोन वेळचे जेवण द्यायला यातला कोणी गेलं नाही. आज ती तिच्या कर्तुत्वावर आणि कलेवर पुढे जाते तेव्हा कोणाच्या पोटात दुखण्याची काय कारण आहे? असा प्रश्न कोल्हे यांनी उपस्थित केला.
… तर कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण काय? राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवालBy AIN News TV| 33 views
Featured Channel
Featured Videos
Bigg Boss 17 LIVE | Tissue Ko Lekar Isha Ne Samarth Se Kiya Jhagda
Bigg Boss 17 LIVE | Tissue Ko Lekar Isha Ne Samarth Se Kiya Jhagda
#biggboss17 #abhishekkumar #ishamalviya
- Stay Tuned For More Bollywood News
☞ Check All Bollywood Latest Update on our Channel
☞ Subscribe to our Channel https://goo.gl/UerBDn
☞ Like us on Facebook https://goo.gl/7Q896J
☞ Follow us on Twitter https://goo.gl/AjQfa4
☞ Circle us on G+ https://goo.gl/57XqjC
☞ Follow us on Instagram https://goo.gl/x48yEy
Bigg Boss 17 LIVE | Tissue Ko Lekar Isha Ne Samarth Se Kiya JhagdaBy Bollywood Spy| 51 views
Special Briefing on the Visit of President of Maldives to India (August 02, 2022)
Special Briefing on the Visit of President of Maldives to India (August 02, 2022)By Ministry of External Affairs, India| 194307 views
Bhumi Pednekar on reaction to Thank You For Coming, OMG 2, lack of gender equality, viewer hypocrisy
Bhumi Pednekar recently appeared in the comedy Thank You For Coming and the film invited some extreme reactions from the viewers. While some praised the film for its bold concept, some shamed it for that. In an exclusive conversation with Bollywood Bubble host Akash Bhatnagar, Bhumi spoke about the latter group of people and slammed them for the shaming. She expressed her disappointment towards people who didn’t criticise the film but its intent. The actress discussed the prevalent gender bias and how people never took offence when she was a part of such stories told from a male perspective. She pointed out how Pankaj Tripathi and Akshay Kumar starrer OMG 2 was supported by the same people who shamed her film, when somewhere they dealt with the same subject. Bhumi revealed if not getting any support from women within the industry disappointed her. She highlighted the hypocrisy of the situation that people accept objectification of women but have a problem with them talking about their sexuality. You can watch the entire conversation here.
#BhumiPednekar #BollywoodBubble
Check out the video to know more.
SUBSCRIBE To Bollywood Bubble:
Click Here ► http://bit.ly/2hjMB6X
Tune into Bollywood Bubble, your one stop destination for all the latest happenings, hot gossips, rumours and exclusive B-Town news...
Also, Visit - https://www.bollywoodbubble.com . One stop Destination for Latest Bollywood Updates.
Like us on Facebook - https://www.facebook.com/BollywoodBubble
Follow us on Twitter - https://twitter.com/bollybubble
Follow us on Instagram - https://www.instagram.com/bollywoodbubble/
Click on the Subscribe Button NOW and Stay Tuned.
Bhumi Pednekar on reaction to Thank You For Coming, OMG 2, lack of gender equality, viewer hypocrisyBy Bollywood Bubble| 344 views
India - USA Trade Statistics
Comparative Trade Statistics for the Years 2013 & 2014
(Top 25 Products)Watch India - USA Trade Statistics With HD QualityBy Indian Trade Portal| 467412 views
Delhi Excise Policy: Arvind Kejriwal को ED ने भेजा समन, क्या हो जाएंगे Arrest?
#khabarfastnews #DelhiCMArvindKejriwal #ArvindKejriwaledsummon #SaurabhBhardwaj #LiquorPolicyCase #AamAadmiParty #AAPGovt #kejriwalednotice #khabarfastnews
दिल्ली शराब घोटाले में आम आदमी पार्टी की मुश्किलें कम होने का नाम नहीं ले रही है। सोमवार को सुप्रीम कोर्ट ने मनीष सिसोदिया को जमानत देने से इंकार कर दिया। जिसके चलते आम आदमी पार्टी को एक बड़ा झटका लगा। दिल्ली शराब घोटाले में अब ED ने दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल को 2 नवंबर को पूछताछ के लिए बुलाया है।
Khabar Fast brings the Latest News & Top Breaking headlines on Politics and Current Affairs in India & around the World, Sports, Business, Bollywood News and Entertainment, Science, Technology, Health & Fitness news. To Get updated Press the like Button now
Khabar Fast News Channel:
खबर फास्ट भारत का हिंदी न्यूज चैनल है । खबर फास्ट चैनल हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश और हर एक राज्य से जुड़ी खबर से रुबरु कराता है । ख़बर फास्ट न्यूज चैनल राजनीति, मनोरंजन, बॉलीवुड, व्यापार और खेल में नवीनतम समाचारों को शामिल करता है। खबर फास्ट चैनल की लाइव खबरें एवं ताजा ब्रेकिंग अपडेट न्यूज, प्रोग्राम के लिए बने रहिए- टीवी चैनल्स, सोशल मीडिया (YOUTUBE, FACEBOOK, INSTAGRAM,TWITTER AND WEBSITE)
Khabar Fast is the Hindi news channel of India. Khabar Fast Channel deals with news related to Haryana, Himachal Pradesh, Punjab, Rajasthan, Uttar Pradesh and every state. The Khabar Fast News channel covers the latest news in politics, entertainment, Bollywood, business and sports. Khabar Fast Channel Live news and latest breaking news, stay tuned for the program - TV channels, social media (YOUTUBE, FACEBOOK, INSTAGRAM, TWITTER AND WEBSITE)
Subscribe to Khabar Fast YouTube Channel- https://www.youtube.com/channel/UCzEQ-n1l5Ld6nK5URcv-XHA
Visit Khabar Fast Website- https://www.khabarfast.com/
Follow us on Facebook- https://www.facebook.com/khabarfastTV
Follow us on Twitter- https://twitter.com/KhabaBy Khabar Fast| 81 views
Education ???? पर Arvind Kejriwal की जबरदस्त Speech ???? | Latest Motivational Speech | Aam Aadmi Party
Education ???? पर Arvind Kejriwal की जबरदस्त Speech ???? | Latest Motivational Speech | Aam Aadmi Party
#arvindkejriwal #education #aamaadmiparty
Arvind Kejriwal All Interviews:
https://youtube.com/playlist?list=PLiN7YZXz4nOc23gNiOivcdgeYUEpUUqlU
Arvind Kejriwal All Townhalls:
https://youtube.com/playlist?list=PLiN7YZXz4nOdQ-o4kATbxyeNHjD1SyT8n
Arvind Kejriwal in Punjab Series:
https://youtube.com/playlist?list=PLiN7YZXz4nOcJRxl8iqYDKsL26FKUvmSr
Arvind Kejriwal in Goa Series:
https://youtube.com/playlist?list=PLiN7YZXz4nOflmK5x_tdfrryxrSc3SBzm
Arvind Kejriwal In Uttarakhand Series:
https://youtube.com/playlist?list=PLiN7YZXz4nOcZ5TuqFQsJUmwRdNwvKsCT
Arvind Kejriwal on Baba Saheb Ambedkar:
https://youtube.com/playlist?list=PLiN7YZXz4nOfWtKqvMU22KihHk2jiUXdS
Follow Arvind Kejriwal on Social Media :
Follow Arvind Kejriwal on Twitter: https://www.twitter.com/ArvindKejriwal
Follow Arvind Kejriwal on Facebook: https://www.facebook.com/AAPkaArvind/
Follow Aam Aadmi Party on Facebook: https://www.facebook.com/AamAadmiParty
Follow Aam Aadmi Party on Twitter: https://www.twitter.com/AamAamAadmiParty
Education ???? पर Arvind Kejriwal की जबरदस्त Speech ???? | Latest Motivational Speech | Aam Aadmi PartyBy AAP| 209312 views
प्याज के दामों ने निकाले आंसू, आमजन की पहुंच से बाहर, जानें कैथल मंडी में कितने रुपए किलो बिक रहे ?
प्याज के दामों ने निकाले आंसू, आमजन की पहुंच से बाहर, जानें कैथल मंडी में कितने रुपए किलो बिक रहे ?
#OnionPriceHike #KaithalMandi #HaryanaNews #LatestNews #JantaTv
Janta TV News Channel:
जनता टीवी हरियाणा, पंजाब और हिमाचल प्रदेश का सर्वश्रेष्ठ हिंदी न्यूज चैनल है। जनता टीवी न्यूज चैनल राजनीति, मनोरंजन, बॉलीवुड, व्यापार और खेल में नवीनतम समाचारों को शामिल करता है। जनता टीवी न्यूज चैनल की लाइव खबरें एवं ब्रेकिंग न्यूज के लिए बने रहें ।
जनता टीवी के साथ देखिये देश-प्रदेश की सभी महत्वपूर्ण और बड़ी खबरें|
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in the favor of fair use.
#JantaTV
#Haryana
#HimachalPradesh
#Punjab
Watch the latest Hindi news Live on Janta TV
Janta TV is Best Hindi News Channel in Haryana, Punjab & Himachal. Janta TV news channel covers the latest news in Politics, Entertainment, Bollywood, Business and Sports.
Stay tuned for all the breaking news in Hindi!
Download Janta TV APP: On Android and IOS
https://play.google.com/store/apps/details?id=com.jantatv&hl=en
खबरों से अपडेट रहने के लिए जनता टीवी से जुड़िए-
Janta TV Telegram
https://t.me/+22_aahu6_44yZTJl
Janta TV Whatsapp
https://chat.whatsapp.com/BT4EgqJdcvsBMA7k1DEdwj
Subscribe to Janta TV YouTube Channel:
https://www.youtube.com/c/jantatvnews?sub_confirmation=1
https://www.youtube.com/c/JantaTVUttarPradeshUttrakhand?sub_confirmation=1
Visit Janta TV website:
https://www.jantatv.com/
Follow us on Facebook:
https://www.facebook.com/JantaTvNews
https://www.facebook.com/jantatvhimachal
https://www.facebook.com/JantaTvPunjab
https://www.facBy Janta TV| 47 views
Jummah की नमाज को लेकर Kashi में Police Alert, चप्पे- चप्पे पर Force तैनात
#gyanvapicase #uttarpradesh #varanasi #policealert #jummah #Friday prayers
Jummah की नमाज को लेकर Kashi में Police Alert, चप्पे- चप्पे पर Force तैनात
#gyanvapicase #uttarpradesh #varanasi #policealert #jummah #Friday prayers #pictures #forces deployed #corner #regarding #Gyanvapi complex #policemen #Manduadih police station # in-chargeBharat Upadhyay #patrolled # Bansfatak area #security arrangements #Gyanvapi #Police Commissioner Mutha Ashok Jain #security #arrangements #sensitive places #experience #police #darshan puja started #Vyasji's basement #saint community #officials # Kashi Vidvat Parishad #performed #Gyan Talgriha #Gyan Talgrihnews #Committee #approved # five o'clock aarti # first aarti
Follow Us On:
Facebook : https://www.facebook.com/INDIALNV
Twitter : https://twitter.com/india_lnv
Instagram : https://www.instagram.com/lnv_india/Follow Us On:
Facebook : https://www.facebook.com/INDIALNV
Twitter : https://twitter.com/india_lnv
Instagram : https://www.instagram.com/lnv_india/
Jummah की नमाज को लेकर Kashi में Police Alert, चप्पे- चप्पे पर Force तैनातBy LNV India| 0 views