गाजावाजा करत 2 हजारांची नोट दाखवत होते अन् आता…, संजय राऊत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
गाजावाजा करुन दोन हजारांची नोट आणली होती. आता ती बंद केली, असं भाष्य करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन हजारांच्या नोटेच्या निर्णयावर प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले, काळापैसा परत आणू, दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करणाऱ्यांचं कंबरडं मोडलं जाईल असे म्हणाले होते, ते काहीच झालं नाही. लोकांना रांगेत उभं केलं. लोकांना अत्यवस्थ केलं. पुन्हा केंद्र सरकार त्याच मार्गावर आल्याचे म्हणत हजार, पाचशे रूपयांची नोटबंदी केली ती नोट परत येणारे का? असा सवाल करत संजय राऊत यांनी दोन हजारांच्या नोटबंदीवर आपली भूमिका मांडली. मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेशी खेळखंडोबा केलाय. त्यामुळे महागाईपासून बेरोजगारीचा भस्मासूर उभा राहिला असल्याचे संजय राऊत यांनी म्हणत मोदी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे.
जळगाव जिल्हा आणि खान्देशातील मंजूर झालेले अनेक विकास प्रकल्प दुसरीकडे हलवण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी ‘महाराष्ट्रातून खान्देश वेगळा करा’, अशी मागणीही केली. यावर संजय राऊतांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, विदर्भाची पुर्वी तशीच मागणी होती. तशी आता खान्देशची आहे. खान्देशचे काय प्रश्न असतील तर एकनाथ खडसे यांनी ते उठवले पाहिजे. त्यांना आम्ही पाठिंबा देऊ, असे संजय राऊत म्हणाले. तर एकनाथ खडसे यांच्या सारखे प्रमुख नेते विरोधी पक्षात असताना जर प्रश्नच उपस्थित केले गेले नाही तर विकास कसा होणार…असेही पुढे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
गाजावाजा करत 2 हजारांची नोट दाखवत होते अन् आता…, संजय राऊत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोलBy AIN News TV| 56 views
त्र्यंबकेश्वर मंदिरातील ‘त्या’ घटनेवर राज ठाकरे यांची सडेतोड प्रतिक्रिया; “तो निर्णय…, बाहेरच्यांची
त्र्यंबकेश्वर मंदिरातील धूप दाखवण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर उरुस आयोजकांनी पुढच्या वर्षीपासून त्र्यंबकेश्वराला धूप न दाखवण्याचा निर्णय घेतला. मात्र यानंतरही तेथे शुद्धीकरण सारखे राजकारण झाले. यावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण तापलं. याचमुद्द्यावरू मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अनेकांना झापलं आहे. तर हा प्रश्न गावकरी आणि तेथील संस्थानाचा आहे. तो त्यांनीच सोडवायचा. त्यात यात बाहेरच्या लोकांनी तिथे जाऊन आंदोलन करण्याची गरज नाही. चुकीच्या गोष्टींवर प्रहार करणं गरजेचं आहे. पण जाणूनबुजून काही खोदून काढायचं याला काही अर्थ नाही असे ते म्हणालेत. याबरोबरच महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरं आहेत किंवा अशा मशिदी आहेत जिथे हिंदू-मुस्लीम एकोप्याने राहतात. मला वाटतं जे परंपरा सुरु ठेवली पाहिजे. इतर धर्माचा माणूस आपल्या मंदिरात आला तर इतका भ्रष्ट होणारा इतका कमकुवत धर्म आपला आहे का? असा परखड सवाल करत त्यांनी त्र्यंबकेश्वर प्रकरणावरुन रान उठवणाऱ्यांना फटकारलं आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरातील ‘त्या’ घटनेवर राज ठाकरे यांची सडेतोड प्रतिक्रिया; “तो निर्णय…, बाहेरच्यांचीBy AIN News TV| 74 views
पोपट मेला! फडणवीस आणि अजित पवार यांच्यात वार- पटलटवार; म्हणाले, ‘कोण कुठं मेलय?’
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर 16 आमदारांच्या अपात्रतेवरुन मविआ आक्रमक झाली आहे. त्यावरूनच आता मविआ विरुद्ध भाजप-शिंदे गटात वार प्रहार होताना दिसत आहेत. तर यावरूनच उद्धव ठाकरे यांनी आता फक्त पोपट मेल्याचं काम विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी करायचं आहे असं म्हटलं होतं. तर त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांना पोपट मेला असं कुणी सांगतच नाहीय. शिवसेना ही शिल्लक सेना आहे, असे टीकास्त्र सोडलं होतं. तसेच राजीनामा नाट्य टीआरपीसाठी होते असं म्हणत फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. यावरून आता मविआ-भाजपत पोपटावरुन सामना सुरु असताना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील आता पोपटावरुन टीका केली आहे. पोपट मेला नाही, मैना मेली नाही, मोर मेला नाही. सगळे जिवंत आहे. कोण कुठं मेलय दाखवा असं म्हणत अजित पवार यांनी फडणवीस यांना टोला लगवला आहे.
पोपट मेला! फडणवीस आणि अजित पवार यांच्यात वार- पटलटवार; म्हणाले, ‘कोण कुठं मेलय?’By AIN News TV| 85 views
सबसे कातिल गौतमी पाटील लग्नाच्या चर्चांवर थेट म्हणाली, ‘माझा लग्नाचा…’
गौतमी पाटील तिच्या नृत्यामुळे आणि तिच्या दिलखेचक अदांमुळे नेहमीच चर्चेत असते. गौतमी पाटील हिचा कार्यक्रम कुठेही असो तिचा चाहता वर्ग आवर्जून तिच्या कार्यक्रमाला हजेरी लावतो. दिवसेंदिवस गौतमी पाटील हिची क्रेझ तरूणाईत वाढताना दिसत आहे. अशातच तिच्या लग्नाच्या चर्चाही सोशल मिडियावर गेल्या काही दिवसांपूर्वी होताना दिसत होत्या. मध्यंतरी गौतमी पाटील तिचा नवरा कसा असावा, यावर बोलली होती. त्यामुळे तिच्या लग्नाच्या चर्चेला तेव्हापासून सुरुवात झाली होती. मात्र या सुरू असलेल्या चर्चांना गौतमी पाटील हिनं पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळत आहे. पंढरपूर येथील सांगोला तालुक्यातील घेरडी गावात रासप नेत्याच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील कार्यक्रमास आली होती. यावेळी तिला तिच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला असता ती म्हणाली, सध्या तरी माझा लग्नाचा कोणताही विचार नाही. जेव्हा असं काही ठरेल तेव्हा मी नक्की सांगेन. असं म्हणत गौतमी पाटील हिने आपल्या लग्नाबद्दल सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
सबसे कातिल गौतमी पाटील लग्नाच्या चर्चांवर थेट म्हणाली, ‘माझा लग्नाचा…’By AIN News TV| 95 views
‘महाराष्ट्रातून खान्देश वेगळा करा’, एकनाथ खडसे यांची मोठी मागणी, नेमकं कारण काय
जळगाव जिल्हा आणि खान्देशातील मंजूर झालेले अनेक विकास प्रकल्प दुसरीकडे हलवण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर त्यांनी ‘महाराष्ट्रातून खान्देश वेगळा करा’, अशी मागणीही केली आहे. एकनाथ खडसे यांनी खान्देशासाठी मंजूर झालेले पण नंतर इतर जिल्ह्यांमध्ये स्थलांतरीत झालेल्या प्रकल्पांची यादी सांगत खान्देशावर अन्याय होत असल्याची भूमिका एकनाथ खडसे यांनी मांडली. याच रागापोटी त्यांनी वेगळ्या खान्देशाची मागणी केली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या दहा-बारा वर्षांपासून अनेक मोठ्या प्रकल्पांना परवानगी मिळाली आहे. काही प्रकल्प पाईपलाईनमध्ये आहेत. काही कालखंडात ते मंजुरीपर्यंत पोहोचून गेले आहेत. पण गेल्या 10 वर्षात असं लक्षात आलं की, या प्रकल्पांना वेग तर आला नाहीच, पण इथले प्रकल्प बाहेर जिल्ह्यामध्ये हलवण्याचा प्रयत्न होतोय, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही टीका केली आहे.
‘महाराष्ट्रातून खान्देश वेगळा करा’, एकनाथ खडसे यांची मोठी मागणी, नेमकं कारण कायBy AIN News TV| 5 views
Rs 2000 Ban : ”कुठला काळा पैसा बाहेर येणार?”; राष्ट्रवादी नेत्याची भाजपवर टीका
शुक्रवारी (19 मे) संध्याकाळी एक धक्कादायक निर्णय घेत RBI ने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याची घोषणा केली. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत वैध मानल्या जातील, असे आरबीआयने म्हटले आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर राजकारणही तीव्र तापलेलं आहे. यासोबतच अनेक राजकीय प्रतिक्रियाही समोर येऊ लागल्या आहेत. यादरम्यान मोदी सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी यावेळी भाजपने याच्या आधी केलेल्या नोट बंदीत काय निघालं जे आत्ता परत हेच करायला निघालेच असा सवाल केला आहे. तर आता यावेळी नोट बंदी करून काय बाहेर येणार आहे हे माहित नाही असा टोला लगावला आहे. तर हे फक्त आता इलेक्शन जवळ येत आहेत म्हणून सुरू आहे. याचा अर्थ व्यवस्थेवर खूप वाईट परिणाम होईल ज्यामुळे बदल होतील असेही ते म्हणाले. भाजपवर हल्ला चढवताना तुम्हीच दोन हजराच्या नोटा आणल्यात आणि परत तुम्हीच त्या रद्द करत आहात. त्यामुळे त्या सगळ्यात जास्त कोणाकडे आहे हे सगळ्यांना माहित आहे. तर या नोट बंदीमुळं मोठा व्यक्ती मोठा झाला लहान माणूस लहान झाला. यामुळे सामन्य नागरिकांना त्रास होणार असेही ते म्हणाले.
Rs 2000 Ban : ”कुठला काळा पैसा बाहेर येणार?”; राष्ट्रवादी नेत्याची भाजपवर टीकाBy AIN News TV| 13 views
‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा राजीनामा अन् उलट सुलट चर्चेला पूर्णविराम
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूरही करण्यात आला आहे. मात्र गोकुळचं चाचणी लेखापरीक्षण सुरू असताना हा राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्यात उलट सुलट चर्चा सुरू आहे. आपला राजीनामा सत्तांतरानंतर ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसारच आहे.. शिवाय गोकुळचे लेखापरीक्षण हे राजकीय हेतून केलं जात असून यामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी स्पष्ट केलय.. त्यामुळे या उलट सुलट चर्चेला पूर्णविराम दिला आहे. गेल्या दोन वर्षाच्या काळात आपण जिल्हा उत्पादक दूध संघाची 2550 कोटी वरून 3420 कोटी रुपयांवर उलाढाल झाली असून 870 कोटी रुपयांची वाढीव उलाढाल झाल्याचं त्यांनी स्पष्ट केले. तसंच दोन वर्षाच्या कालावधीत दूध उत्पादकांना दूध खरेदीसाठी सात वेळा दूध खरेदी दरात वाढ देखील केली आहे. मात्र जवळपास 20 नवीन बाबी केल्याचा आपल्याला आनंद असून गोकुळचे चाचणी लेखा परीक्षणात कोणतेही तथ्य नसून राजकीय द्वेशापोटी विरोधक हे करत असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा राजीनामा अन् उलट सुलट चर्चेला पूर्णविरामBy AIN News TV| 11 views
लोकसभा निवडणुकीसाठी ‘मविआ’मध्ये 16-16 जागांचा फॉर्म्युला ठरला? संजय राऊत यांनी थेट सांगितलं…
लोकसभा निवडणुकीसाठी ‘मविआ’मध्ये 16-16 जागांचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती चुकीची असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय रऊत यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये 16-16 जागांचा असा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भातील प्राथमिक चर्चा आता सुरू झाल्या आहेत. शरद पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत कोणी, कुठे बैठक घ्यायची याबाबत चर्चा झाली. मात्र जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे आणि कायम राहिल. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या मविआच्या वज्रमुठीनेच लढवल्या जातील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. तर कोणी काहीही म्हणो पण आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाही आणि होणारही नाही, असा विश्वास व्यक्त करत सध्या सत्तेत असलेल्या शिंदे फडणवीस सरकारला घटनाबाह्य असल्याचे म्हणत सत्तेतून घालवू असा इशाराही यावेळी संजय राऊत यांनी दिला. तसेच 2019 मध्ये महाराष्ट्रात जिंकलेल्या 18 जागा शिवसेनेकडे राहणार आहे. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचा विजय होईल अन् पुढील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे महाराष्ट्रातील 18 आणि दादरा नगर हवेलीतील एक असे सर्व 19 जण निवडून येतील, असा दावा संजय राऊत यांनी केला.
लोकसभा निवडणुकीसाठी ‘मविआ’मध्ये 16-16 जागांचा फॉर्म्युला ठरला? संजय राऊत यांनी थेट सांगितलं…By AIN News TV| 49 views
मग कुणाचा पोपट मेलाय ते जनताच दाखवेल, संजय राऊत यांची सडकून टीका
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकारिणीत शरद पवार यांच्या लोक माझे सांगती या पुस्तकातील दहा वाक्य वाचून दाखवली. त्यावर संजय राऊत यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, फडणवीस यांच्यावर सुद्धा काही वाक्य आहेत. ती पण त्यांनी वाचून दाखवायला पाहिजे होती. काल त्यांच्याच बैठकीत अर्धे लोक झोपलेले होते. कोण जांभया देतंय कोण झोपतंय अशा मेलेल्या कार्यकारिणीसमोर हे आमची खिल्ली उडवतात. यावर त्यांनी पोपटावरही भाष्य केले. विधानसभा अध्यक्ष हे महात्मा आहेत. त्यांच्याकडून आम्हाला चांगल्या निर्णयाची अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की पोपट मेलाय. आता कुणाचा पोपट उडतोय आणि कोणत्या वाघाची गर्जना होतेय हे त्यांना कळेल. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांत जे चित्र दिसलं ती फक्त झलक आहे. १४ महापालिकांच्या निवडणुका ताबडतोब घ्या मग कळेल कुणाचा पोपट मेलाय. हे जनता दाखवेल, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
मग कुणाचा पोपट मेलाय ते जनताच दाखवेल, संजय राऊत यांची सडकून टीकाBy AIN News TV| 65 views
‘सरदार आहात, तुम्हीच बारामती लढा; ताकद पाहायची असेल तर…’, चंद्रशेखर बावनकुळे यांना कुणाचा इशारा?
पुणे जिल्हा कुणाची जहागिरदारी नाही, आम्ही बारामती जिंकू, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. इतकेच नाही तर ते सातत्याने पावर कुटुंबियांवर निशाणा साधताना देखील दिसताय. यावर राष्ट्रवादीचे नेते दिलीप मोहिते पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘चंद्रशेखर बावनकुळे इतके मोठे असते तर त्यांचं तिकीट कापलं नसतं. त्यांच्या निवडून येण्याची खात्री नव्हती. जो मागच्या दाराने विधानपरिषदेत निवडून आलाय. तो बारामतीबद्दल काय भाष्य करणार?’, असा सवाल दिलीप मोहिते पाटील यांनी उपस्थित केलाय. पुढे ते असेही म्हणाले की, ज्यावेळी अजित पवार यांच्याकडे ऊर्जा खातं होतं तेव्हा ठेकेदारीचं काम बावनकुळे यांनी केलंय, त्यामुळे त्यांना अनुभव घ्यावा. तर चंद्रशेखर बावनकुळे यांना बारामतीची ताकद पाहायची असेल तर त्यांनी स्वतः निवडणूक लढवावी दुसऱ्यांचा बळी का द्यावा, असे म्हणत इशारा दिला आहे.
‘सरदार आहात, तुम्हीच बारामती लढा; ताकद पाहायची असेल तर…’, चंद्रशेखर बावनकुळे यांना कुणाचा इशारा?By AIN News TV| 45 views
तुळजाभवनीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, मंदिरातील ड्रेस कोड प्रकरणी संस्थानचा ‘यु टर्न’
महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरासाठी ड्रेस कोडची नियमावली तयार करण्यात आल्याचे समोर आले होते आणि अवघ्या काही तासात तुळजाभवानी मंदीर संस्थानने या निर्णयावरुन यु टर्न घेतल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, तुळजाभवानी मंदिर परिसरात याबाबत फलकही लावण्यात आले होते. तुळजाभवानी मंदिरात अंगप्रदर्शन करणारे वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना नो एन्ट्रीचा निर्णय घेण्यात होता. याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थानने मंदिर परिसरात याबाबतचे फलक लावले होते. पण या निर्णयावर सोशल मीडियावर अनेकांकडून आक्षेप घेण्यात आल्याचे पाहायला मिळाले. गुरुवारी दुपारी मंदिर प्रशासनाने मंदिरात तोडक्या कपड्याने जाता येणार नाही, असा निर्णय अचानक घेतला. त्यासंदर्भातील फलक लावण्यात आले. गुरूवारी दुपारीनंतर वेस्टर्न कपडे किंवा तोडके कपडे असणाऱ्या कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. परंतु यानंतर समाजातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला. तुळजाभवानी मंदिरात अंगप्रदर्शन करणारे तोकडे कपडे घालणाऱ्यांना काल नो एन्ट्री होती. त्याबाबत बॅनर सुद्धा लावले होते. मात्र तो निर्णय मागे घेतला असून बॅनर काढले आहेत. अवघ्या 7 तासात मंदिर संस्थांनाने भूमिका बदलत निर्णय मागे घेतला आहे. या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
तुळजाभवनीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, मंदिरातील ड्रेस कोड प्रकरणी संस्थानचा ‘यु टर्न’By AIN News TV| 36 views
ठाकरे यांच्या अडचणीत वाढ? ‘मुंबई मनपातील भ्रष्टाचाराची SIT चौकशी लावा’, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यावेळी शिवसेना-भाजप युतीचा झेंडा महापालिकेवर फडकवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. यासाठी मुंबई महापालिकेतील घोटाळा बाहेर काढण्याचा प्रयत्न भाजपच्यावतीने केला जात आहे.गेली 25 वर्ष मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व होतं. आता त्यातचं शिवसेनेच्याच नेत्याने मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘गेली 25 वर्ष उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात असं एक ही काम झालं नाही ज्यात भ्रष्टाचार झाला नाही. आम्ही वेळ येईल तेव्हा सगळ्यांना ते दाखवू. या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी. गरज पडली तर एसआयटी चौकशी लावावी आणि गुन्हेगारांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ठाकरे यांच्या अडचणीत वाढ? ‘मुंबई मनपातील भ्रष्टाचाराची SIT चौकशी लावा’, शिवसेनेच्या ‘या’ नेत्यानेBy AIN News TV| 99 views
गौतमीताई तुम्हाला फेमस व्हायचं असेल तर जरूर व्हा, पण...', या पुढाऱ्याचं आवाहन गौतमी पाटील ऐकणार का?
पब्लिक अक्षरश: राडा घालते. मात्र गौतमी पाटील हिचा डान्स आणि त्यासाठी होणाऱ्या गर्दीवर महाराष्ट्रातील सर्वांचा लाडका छोटा पुढारी घनश्याम दराडे याने गौतमी पाटीलला चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळाले आहे. “गौतमी पाटील यांनी महाराष्ट्राचा बिहार करू नये. गौतमी पाटलांचा कोणत्याही कार्यक्रम शांततेत पार पडलाय, असं दिसत नाही. लावणी ही लावणी ठेवा. त्याला अश्लीलतेचा रंग देवू नका. तो अश्लीलतेचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. तुम्हाला फेमस व्हायचे असेल तर जरूर व्हा. मात्र ते तुमच्या कर्तुत्वावर. चुकीच्या पद्धतीने अश्लीलता दाखवून फेमस होऊ नका”, असा इशाराच त्याने गौतमीला दिला आहे.
गौतमीताई तुम्हाला फेमस व्हायचं असेल तर जरूर व्हा, पण...', या पुढाऱ्याचं आवाहन गौतमी पाटील ऐकणार का?By AIN News TV| 33 views
‘म्हणून मी सुषमा अंधारे यांना दोन फटके मारले’, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव स्पष्टच
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या नेतृत्वातील महाप्रबोधन यात्रा सध्या बीडमध्ये पोहोचली आहे. या दरम्यान ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचा दावा केला आहे. पण हा दावा सुषमा अंधारे यांनी फेटाळून लावला आहे. मला कुठलीही मारहाण झाली नसल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. तर एखादा जिल्हाप्रमुखाने महिलेवर हात उचलला, असं जाहीरपणे म्हणतो. त्याला आपल्यावर पोलीस केस होईल याची भीती वाटत नाही. याचा अर्थ या जिल्हा प्रमुखाला शिंदे गट आणि गृह मंत्रालयाकडून अभय आहे. त्यातूनच तो तसा बोलतोय. असे म्हणत महाप्रबोधन यात्रा दणक्यात होणार असल्याचा विश्वासही सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी पक्षात दमदाटी सुरू केली आहे. त्या सतत पैसे देखील मागत आहेत, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ते पद विकण्याचे काम करत आहेत म्हणून मी सुषमा अंधारे यांना दोन फटके मारले आहे असा दावा आप्पासाहेब जाधव यांनी केला आहे.
‘म्हणून मी सुषमा अंधारे यांना दोन फटके मारले’, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव स्पष्टचBy AIN News TV| 21 views
‘गौतमी पाटील यांनी महाराष्ट्राचा बिहार करू नये अन्… ‘या’ पुढाऱ्यानं दिला इशारा
गौतमी पाटील आणि गर्दी हे समीकरण ठरलेलंय. गौतमी जिथे जाते तिथे गर्दी होतेच होते. गौतमीचा डान्स म्हटला तर टांगा पलटी घोडे फरार अशी प्रेक्षकांची गर्दी असते. बऱ्याचदा गौतमीच्या कार्यक्रमात बसायला जागा नसते म्हणून कुणी झाडावर जाऊन बसतो तर कुणी घराच्या छतावर जाऊन गौतमीच्या दिलखेचक अदा न्याहाळताना दिसतो. गौतमीच्या कार्यक्रमात इतकी गर्दी असते की पोलिसांना जमावावर लाठीमार करावा लागतो. गौतमीच्या कार्यक्रमात नुसती गर्दी होत नाही तर गर्दीचा धुमाकूळ असतो.
‘गौतमी पाटील यांनी महाराष्ट्राचा बिहार करू नये अन्… ‘या’ पुढाऱ्यानं दिला इशाराBy AIN News TV| 19 views
परमबीर सिंह भाजपचे एजंट? मविआ कोसळण्यासाठी कोणी केले प्रयत्न? अमोल मिटकरी यांच्या निशाण्यावर कोण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील निलंबनाची कारवाई शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेतली आहे. हा परमबीर सिंह यांच्यासाठी मोठा दिलासा आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या काळात परमबीर सिंह यांचं निलंबन करण्यात आलं होतं. परमबीर सिंह यांच्यामुळे अनिल देशमुख यांना तत्कालीन गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली अनिल देशमुख हे बराच काळ तुरुंगातही होते. आता परमबीर सिंह यांच्यावरील कारवाई मागे घेतल्यामुळे विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘परमबीर सिंह भाजपचे एजंट होते का ? परमबीर सिंह भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते का? त्यामुळे बक्षिस म्हणून त्यांना पुन्हा रुजू करून घेतलं का?’, असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे. तसेच ‘महाविकास आघाडी सरकार कोसळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रामाणिक प्रयत्न केले होते’, असा आरोप देखील अमोल मिटकरी यांनी केला आहे.
परमबीर सिंह भाजपचे एजंट? मविआ कोसळण्यासाठी कोणी केले प्रयत्न? अमोल मिटकरी यांच्या निशाण्यावर कोण?By AIN News TV| 37 views
बच्चू कडू यांची मंत्रिपदाची मागणी पूर्ण होईना, आता म्हणतात किमान पालकमंत्री तरी द्या!
आमदार बच्चू कडू यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहे. कडू यांनी राज्यातील जिल्ह्यात प्रत्येकी एक पालकमंत्री देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘मंत्रिमंडळ विस्तार गरजेचा आहे. कुणी नाराज होईल या माध्यमातून विस्तार थांबत असेल तर चुकीचं आहे. सरकार हे जनतेच्या सेवेसाठी आहे. एखाद्याकडे आठ-आठ जिल्हे आणि पालकमंत्री म्हणून पाहत असेल आणि आठ-आठ खाते सांभाळत राहत असेल तर ते योग्य नाही आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रत्येकी एक पालकमंत्री द्या’, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आह. मंत्रिमंडळ विस्ताराबाबतीत बच्चू कडू यांची अनेक विधानं चर्चेत आली आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांना स्थान मिळेल की नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.
बच्चू कडू यांची मंत्रिपदाची मागणी पूर्ण होईना, आता म्हणतात किमान पालकमंत्री तरी द्या!By AIN News TV| 4 views
मविआ बैठकांवर भाजपच्या मोठ्या नेत्याचा टोला; म्हणाला, किती ही बैठका घ्या… पण, सरकार हे…
देशात होणार्या आगामी 2024 च्या लोकसभा आणि त्यानंतर येणाऱ्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीवरून महाविकास आघाडीत सध्या बैठकाचं सत्र सुरू झालं आहे. काँग्रेसने कर्नाटकमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर राज्यात या हालचालींना वेग आला आहे. तर कर्नाटकमध्ये जो बदल झाला तो राज्यात पहायला मिळेल. पण त्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र लढायला हवं असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं होत. त्यानंतर या बैठका आता मुंबईत पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर होताना दिसत आहेत. त्यावरून भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी टीका केली आहे. तसेच 2024 च्या संदर्भात मोठं विधान केलं आहे. ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दानवे यांनी, महाविकास आघाडीच्या बैठकींच्या पार्श्वभूमीवर बोलताना, त्यांच्या बैठका होऊ द्या. त्यांचे दौरे होऊ उद्या. पण 2024 च्या निवडणुकीत ठरलेलं आहे तेच होईल. या राज्यात आणि देशात पुन्हा मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार येणार. त्यामुळे त्यांच्या किती बैठका झाल्यातरी आम्हाला काय फरक पडत नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.
मविआ बैठकांवर भाजपच्या मोठ्या नेत्याचा टोला; म्हणाला, किती ही बैठका घ्या… पण, सरकार हे…By AIN News TV| 113 views
राष्ट्रवादीतून बडतर्फ नेत्याचा हल्लाबोल; म्हणाला, यात खडसेंचा हात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगावचे नेते आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. यावरून त्यांनी आता थेट आपला मोर्चा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे वळवला आहे. तसेच त्यांच्यावर हल्लाबोल करताना आरोप केला आहे की त्यांच्या बडतर्फीच्या कारवाईत खडसे यांचा हात आहे. तसेच त्यांनी खडसे तसंच जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी आपल्याविषयी तक्रार केल्यामुळे बडतर्फीची कारवाई करण्यात आली. बडतर्फीची कारवाई हे कट कारस्थान या दोन्ही नेत्यांचा असल्याचा खळबळजनक आरोप पवार यांनी केले आहेत. तर अजित पवार यांचे आपण कट्टर समर्थक आहोत म्हणूनच जिल्ह्यातील नेते माझ्याविरुद्ध कट कारस्थान करत असल्याचा आरोपही पवार यांनी केलाय. धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट व भाजपसोबत ते गेले. तसेच भाजपचा पाठिंबा घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत केले. यासह भाजप नेते गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांचे एकत्र फोटो असलेली जाहिरात दिली. यामुळे त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. आहे
राष्ट्रवादीतून बडतर्फ नेत्याचा हल्लाबोल; म्हणाला, यात खडसेंचा हातBy AIN News TV| 93 views
कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेस नेते सुरजेवालांचं यांची पत्रकार परिषद
LIVE | कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेस नेते के सी वेणूगोपाल , सुरजेवालांचं यांची पत्रकार परिषद
कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेस नेते सुरजेवालांचं यांची पत्रकार परिषदBy AIN News TV| 46 views
जळगावात भाकरी फिरताच पक्षातून बडतर्फ केलेल्या नेत्यानं दिलं थेट चॅलेज? म्हणाला, ‘दूध का दूध, पाणी
भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जाहिरातीत आणि पक्षनिरोधी कृत्य केल्याने येथील एका राष्ट्रवादीच्या नेत्याची पक्षाने हाकालपट्टी करण्यात आली. वाढदिवसानिमित्तच्या जाहिरातीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो वापरण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मी भाजप शिंदे गटाला मतदान केलं नाही तर त्यांनी मला केलं आहे. त्यामुळे पक्षविरोधी असं मी काही केलेलं नाही. तर मी काही नाराज नाही. उलट मी याबाबत विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे तक्रार करणार. तसेच आपण मरेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर जिल्ह्यातील भाकरी आता फिरवायलाच हवी. माझ्या बाबत काही असेल तर समोर बसा मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असेही ते म्हणाले. मग कारवाई करावी असं आवाहन त्यांनी दिलं आहे.
जळगावात भाकरी फिरताच पक्षातून बडतर्फ केलेल्या नेत्यानं दिलं थेट चॅलेज? म्हणाला, ‘दूध का दूध, पाणीBy AIN News TV| 119 views
त्र्यंबकेश्वर मंदिर वादावर पडदा? पुजाऱ्यांची इच्छा नसल्यास, ‘धूप प्रथा’ बंद करू? कोणाची नाराजी?
त्र्यंबकेश्वर मंदिरात दुसऱ्या धर्माच्या गटाने प्रवेशाची मागणी केल्यावरून निर्माण झालेल्या वादात पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही गटांना समज देत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यावरून अनेक बातम्या पेरल्या गेल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये वर्षानुवर्षे हिंदू-मुस्लीम धर्मीय गुण्यागोविदांने राहतात, आजवरच्या इतिहासात असा वाद कधीच निर्माण झाला नव्हता अशी नाराजी नगर वासियांसह शांतता समितीचे सदस्य नबीयून शेख यांनी व्यक्त केली आहे. तर याबाबत खूपच भडक बातम्या दाखवण्यात आल्या. त्र्यंबकेश्वरच्या इतिहासात कधीच धार्मिक कार्यक्रमांना गालबोट लागलेलं नव्हतं. धूप प्रथेबाबत काही लोक म्हणतात की आधीपासून हे केलं जात होतं, काही जण म्हणतात, तसं केलं जात नव्हतं. त्यामुळे संदलदरम्यान धूप दाखवण्याच्या प्रथेवर कुणाचा आक्षेप असेल तर ही प्रथा बंद करू, असं संदल आयोजकांनी मान्य केलं आहे. माझ्या माहितीनुसार, कधी पायरीपर्यंत जाऊन कधी बाहेरून धूप देण्यात येत होती. गेल्या काही वर्षांत कोरोनामुळे मिरवणूक झाली नाही, पण आता मिरवणूक पुन्हा सुरू झाली होती. पण इथून पुढे पुजाऱ्यांची इच्छा नसल्यास धूप आरती करणार नाही, असं आयोजकांनी म्हटलं आहे. हे प्रकरण विनाकारण वाढवून-चढवून मांडलं जात आहे अशीही नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर वादावर पडदा? पुजाऱ्यांची इच्छा नसल्यास, ‘धूप प्रथा’ बंद करू? कोणाची नाराजी?By AIN News TV| 95 views
जागा वाटपाचा फार्म्युलाच काँग्रेस, राष्ट्रवादीला मान्य नाही, शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट; म्हणाला,
काही दिवसांपुर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिलव्हर ओकवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यात लोकसभा निवडणूक आणि विधानसभेवर जागा वाटपावरून चर्चा झाली. तर आगामी निवडणूक आघाडी म्हणूनच लढण्याचे ठरले. मात्र याच दरम्यान मविआतील वाद समोर आला आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी थेट आपल्याच मित्र पक्षांवर आरोप केले. मुलाखतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे चर्चेपेक्षा वेगळे मुद्दे सांगतात असे ते म्हणाले. त्यावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मविआवर टीका केली आहे. त्यांनी मविआत काहीच अलबेल नाही. तर राष्ट्रवादीला ठाकरे गटाची किती ताकद आहे हे कळाल्यानेच ते त्यांची भूमिका मांडत आहेत असं म्हटलं आहे. तर समान जागा वाटपाचा फार्म्युला हा काँग्रेस, राष्ट्रवादीला मान्य नसल्याचा गौपस्फोट देखील त्यांनी केला आहे. त्यामुळेच ही आघाडी टिकणार की नाही असा संभ्रम निर्माण झाल्याचं ते म्हणाले.
जागा वाटपाचा फार्म्युलाच काँग्रेस, राष्ट्रवादीला मान्य नाही, शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट; म्हणाला,By AIN News TV| 87 views
‘नार्वेकर सुप्रसिद्ध वकील, परंतु कालचं वक्तव्य डोक्यावर पडल्यासारखं’-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची
जितेंद्र आव्हाड यांनी राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘राहुल नार्वेकर हे जबाबदारीच्या पदावर बसले आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर टीका केली. ते ज्या पदावर बसून निर्णय देणार आहेत, त्यांचं ते बोलणं आणि सर्वोच्च न्यायायलयाचा निकाल या दोन्ही गोष्टीत विरोधाभास आहेत. 2023 चा राजकीय पक्ष ते 2022 ला आणणार असतील तर ते हास्यासपद आहे.पक्षातली फूट कोर्टानं नाकारली आहे. त्यामुळे 16 आमदारांना अपात्र करावं लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरची टीका करणं म्हणजे तुम्ही पक्षपाती करण्यासारखं आहे. तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाने जबाबदारी दिली आहे, त्यामुळे तुम्हाला नि:पक्षपातीपणे निर्णय द्यावा लागेल. नार्वेकर यांच्यासारखा हुशार, सुप्रसिद्ध वकील कोर्टाच्या निकालावरती कशी काय टीका करू शकतात?’, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ‘मल्हारराव होळकर यांनी मंदिर बांधण्यासाठी जी लोकं आणली होती तीच लोकं त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये राहिली आहेत. मंदिराच्या समोर फुल विक्रेते असणारे जे मुस्लिम बांधव आहेत, ते प्रत्येक वर्षी त्र्यंबकेश्वरच्या पायऱ्यांवर चादर आणि धुपारती करत असतात.परंतु, या परंपरेला छेद देत हिंदू-मुस्लिम भेद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आहे. या प्रकरणात मी प्रतिक्रिया दिली तर आपोआप जितेंद्र आव्हाड हिंदू-मुस्लिम करतात असा आरोप होतो.दुर्दैवाने हजारो वर्षांच्या परंपरेकडे दुर्लक्ष करत जाणीवपूर्वक वाद लावण्याचा प्रयत्न होत आहे’, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
‘नार्वेकर सुप्रसिद्ध वकील, परंतु कालचं वक्तव्य डोक्यावर पडल्यासारखं’-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचीBy AIN News TV| 52 views
हनी ट्रॅपमध्ये अडकलेले सगळे लोकं RSS आणि भाजपशी संबधित?, संजय राऊत यांचा नेमका दावा काय?
हनी ट्रॅप प्रकरणात प्रदीप कुरुलकर प्रकरणावरही ठाकरे गटाचे खासदार भाष्य केलं. देशद्रोही कोण हे रोज स्पष्ट होताना दिसत आहे. संघाचा एक प्रमुख प्रचारक पाकिस्तानाच्या हनी ट्रॅपमध्ये येतो. त्यावर भाजपचे लोक एसआयटी का नेमत नाही? नाशिकपर्यंत त्याचे धागेदोरे आहेत. हवाई दलाचे लोक त्यामध्ये अडकले आहेत. ते सर्व भाजपशी संबंधित आहेत. नेमा एसआयटी. पण त्यावरचं लक्ष विचलित करण्यासाठी त्र्यंबकेश्वर, अकोला आणि शेवगावात दंगली घडवत आहेत. महाराष्ट्र एकसंघ आहे. राहील. या टोळीबाजांना आम्ही उत्तर देऊ. हे लोक मराठी राज्याचं नुकसान करत आहेत, असा हल्लाबोल राऊतांनी केला. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसून काही मुस्लिम जमावाने चादर चढवण्याचा प्रयत्न केल्यानं तणावाचे वातावरण राज्यात आहे. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला पण रामनवमीच्या वेळी दंगल झाली होती. ती पहिल्यांदाच महाराष्ट्रात दंगल झाली होती. त्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली होती का? असे म्हणत संजय राऊत यांनी राज्य सरकारला फटकारले आहे.
हनी ट्रॅपमध्ये अडकलेले सगळे लोकं RSS आणि भाजपशी संबधित?, संजय राऊत यांचा नेमका दावा काय?By AIN News TV| 27 views
त्र्यंबकेश्वरमधील घटनेवर संजय राऊत यांचं भाष्य; म्हणाले, ‘मोदींपासून आम्ही सगळे
महाविकास आघाडीत असलेल्या संजय राऊत यांचा हिंदुत्वाशी संबंध काय? असा प्रश्न नकली हिंदुत्ववाले उपस्थित करत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. ते नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात झालेल्या प्रकरणासंदर्भात माध्यमांशी बोलत होते. त्र्यंबकेश्वर आमच्या श्रद्धेच्या आणि अस्थेचा विषय असल्याचे म्हणत राऊत म्हणाले, कोणीही त्र्यंबक मंदिरात घुसल्याची माहिती नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून पत्र द्यायला लावलं. त्यांनीच आज त्र्यंबकेश्वरला बंद करायला सांगितलं आहे. ऊरूस उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संदलची परंपरा 100 वर्षांची आहे. मंदिराच्या दारावर देवाला धूप दाखवून पुढे जातात. देशात या परंपरा सर्वत्र आहेत. नरेंद्र मोदींपासून आम्ही सगळे अजमेर शरीफला जातो. माहीम आणि हाजी अलीच्या दर्ग्यात जातो. त्यात काही हिंदूसह संघाचे लोकही आहेत. मला माहीत आहे. पोलीसही चादर चढवतात. पण त्र्यंबकेश्वरच्या नावाने महाराष्ट्रातील वातावरण उद्ध्वस्त करायचं. नकली हिंदुत्वाच्या नावाने बोंबा मारायच्या हे प्रकार सुरू आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. यासह ते असेही म्हणाले की, एसआयटी कसल्या नेमता? तुम्हाला माहीत नाही महाराष्ट्रात काय चाललं ते? राम नवमी संदर्भात एसआयटी नेमली का? राम नवमीला कधी नव्हे त्या दंगली झाल्या. गेल्या 60 वर्षात महाराष्ट्रात दंगल झाली नव्हती. त्यावर एसआयटी नेमली का नाही नेमली? असा सवालही राऊतांनी सरकारला केला.
त्र्यंबकेश्वरमधील घटनेवर संजय राऊत यांचं भाष्य; म्हणाले, ‘मोदींपासून आम्ही सगळेBy AIN News TV| 26 views
‘तुम्ही इकडे या, नाही आले तर…’, मनसे आमदाराने कुणाला दिला दम
केंद्र सरकारच्या अमृत योजनेच्या माध्यमातून कल्याणमध्ये पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून कल्याणच्या 27 ग्रामीण भागात पाण्याच्या टाकी उभारणीचे काम सुरू आहे. मात्र, ही कामे निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रारी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्याकडे आल्या होत्या.त्यानंतर राजू पाटील पाण्याच्या टाकीचं बांधकाम पाहण्यास आले होते. हे काम नित्कृष्ट दर्जाचे आढळ्यानंतर राजू पाटील हे महापालिका अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. ‘इकडे या नाहीतर मारेन’ अशा शब्दात राजू पाटील यांनी अधिकाऱ्याला दम भरला.’सुरू असेललं काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालं आहे. एवढ्या मोठ्या 9 लाख लिटरच्या टाक्या उभारताना जागेवर माल बनवून काम केले जात आहेत. अशा प्रकारे आमच्या येथे चाळीही बनवल्या जात नसतील. इथल्या सत्ताधाऱ्यांनी कोट्यवधीच्या गाड्या घेतल्याच्या बातम्या आम्हाला येतात आणि अशी कामे बघितल्यावर त्यात तथ्य असल्याचं दिसतं. अनेकदा तक्रारी करून यांच्यावर कोणीही कारवाई करत नाही. मी इथल्या इंजिनियर आणि अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की, ठेकेदाराचा गुणवतेबद्दल लेखी तक्रार करा. याचा व्हिजेटीआय कडूज ऑडिट करा’, असे राजू पाटील म्हणाले.
‘तुम्ही इकडे या, नाही आले तर…’, मनसे आमदाराने कुणाला दिला दमBy AIN News TV| 52 views
16 अपात्र आमदारांच्या प्रकरणावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि ठाकरे गटाचे नेते
आता 16 अपात्र आमदारांच्या प्रकरणावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यात रंगला आहे. नार्वेकर यांनी २ महिन्यात निर्णय घ्यावा या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अल्टीमेटवर टोला लगावला होता. त्यांनी, मी चौकशी पूर्ण झाल्यावरच निर्णय घेणार. न्यायालयाला निर्णय घ्यायला 10 महिने लागले मी 2 महिन्यात निर्णय कसा घेऊ, उपस्थित केला होता. त्यावरून आता राऊत यांनी पलटवार केला आहे. तर ते राहुल नार्वेकर आहेत. ते अध्यक्ष असते तर असं बोलले नसते. तर परदेशात बसून त्यांनी ज्याप्रकारे यावर भाष्य केलं आहे. ते फक्त भगतसिंग कोश्यारी यांना शोभत होतं. मात्र घनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने नियमबाह्य वक्तव्य केलं आहे. त्यांना ताडबतोब बडतर्फ करा अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
16 अपात्र आमदारांच्या प्रकरणावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि ठाकरे गटाचे नेतेBy AIN News TV| 44 views
ते अध्यक्ष असते तर…, नार्वेकर यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊत खवळले; म्हणाले, ताडबतोब बडतर्फ
सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाचा निकाल आला आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाचा काही संघर्ष थांबताना दिसत नाही. आधी महाविकास आघाडीत त्यांचा संघर्ष सुरू होता. आता 16 अपात्र आमदारांच्या प्रकरणावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यात रंगला आहे. नार्वेकर यांनी २ महिन्यात निर्णय घ्यावा या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अल्टीमेटवर टोला लगावला होता. त्यांनी, मी चौकशी पूर्ण झाल्यावरच निर्णय घेणार. न्यायालयाला निर्णय घ्यायला 10 महिने लागले मी 2 महिन्यात निर्णय कसा घेऊ, उपस्थित केला होता. त्यावरून आता राऊत यांनी पलटवार केला आहे. तर ते राहुल नार्वेकर आहेत. ते अध्यक्ष असते तर असं बोलले नसते. तर परदेशात बसून त्यांनी ज्याप्रकारे यावर भाष्य केलं आहे. ते फक्त भगतसिंग कोश्यारी यांना शोभत होतं. मात्र घनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने नियमबाह्य वक्तव्य केलं आहे. त्यांना ताडबतोब बडतर्फ करा अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
ते अध्यक्ष असते तर…, नार्वेकर यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊत खवळले; म्हणाले, ताडबतोब बडतर्फBy AIN News TV| 33 views
यंदा मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली बातमी
एप्रिल-मे महिन्यात प्रचंड उकाडा पडल्याने नागरिक हैराण झाले आहेत. राज्यातील तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. पाऊस कधी पडणार याची वाट नागरिक बघत आहेत. दरम्यान हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. यंदा मान्सून जूनच्या पहिल्याच आठवड्यात पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यंदा महाराष्ट्रात 6 जूनला मान्सून दाखल होणार आहे. त्यानुसार मुंबईत यंदा 10 किंवा 11 जूनला मान्सूनचे आगमन होणार आहे.तर केरळमध्ये 4 जून रोजी येणार आहे. दरवर्षी 1 जून रोजी मॉन्सून केरळमध्ये दाखल होतो, मात्र यंदा पाऊस 2 ते 3 दिवस लांबण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे भारतात यंदा 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवला असून मॉन्सूनच्या दुसऱ्या सत्रात भारतात एल निनोचा प्रभाव पाहायला मिळू शकतो.
यंदा मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली बातमीBy AIN News TV| 9 views
Featured Channel
Featured Videos
आज का राशिफल 05 February 2024 AAJ KA RASHIFAL Gurumantra-Today Horoscope || Paramhans Daati Maharaj
आज का राशिफल
आज का राशिफल 2024
आज का राशिफल 2023
आज का राशिफल हिंदी
राशिफल
Astrology
Astro Daati
Rashifal Daati Maharaj
राशिफल today
aaj ka rashifal
Daati Maharaj rashifal
aaj ka Daati rashifal
rashifal aaj ka
aaj ka rashifal in hindi
Daati rashifal
today horoscope
today rashifal
tomorrow rashifal
daily rashifal
rashiphal
dainik rashifal
horoscope today
05 February 2024 aaj ka rashifal
05 February Thursday aaj ka rashifal
गुरुवार ka rashifal
12 राशियां और आप
https://www.youtube.com/watch?v=U676GTxdJqM&list=PL0N7ZGvupMUKeqbyhu35H33HLjkuUIxVZ
शनिदेव और आप 2024
https://www.youtube.com/watch?v=1RO1erU4G7g&list=PL0N7ZGvupMUKc7kMvrBQ9c_6lluOVYPiw
Yearly Rashifal कैसा रहेगा 2024
https://www.youtube.com/watch?v=AbRIyBjh5rk&list=PL0N7ZGvupMUK8ddjMQkLifNTsYD8JA0Ml
आप की राशि 2024 के 6 महत्वपूर्ण घटनाएँ और 6 उपाय
https://www.youtube.com/watch?v=FQ2S-yjxu_0&list=PL0N7ZGvupMULwlT1RCMRxz1GNm5DNMILR
Monthly February Rashifal 2024. February Horoscope 2024
https://www.youtube.com/watch?v=C8AZgKtlWro&list=PL0N7ZGvupMUIPKb_CEZlwFHEoBmJ7uv5T
#aajkarashifal #आजकाराशिफल #TodayHoroscope #DaatiMaharaj2024 #aajako_rashifal #nepalirashifal #rashifal #शुभमुहूर्त #bhavishyavani #Dailyastrology #Dailyhoroscope #JyotishShastra #astrology #आजकाराशिफलहिंदी #05Februaryrashiphal #spiritiualawakening #meditation #RashifalFebruary2024 #FebruaryRashifal #RashifaFebruary #Daatimaharaj #DGM #aajkarashifalhindi #india #shanidham #shanidhamasola #Daatimaharajshanidham #GurumantraWithDaatiMaharaj #Gurumantra #राशिफल #Gurumantratoday
Copyright : Gurumantra With Daati Maharaj
Like * Comment * Share - Don't forget to LIKE the video and write your COMMENT's
Subscribe Us: https://goo.gl/yMVLMR
Like & Follow :- https://www.facebook.com/ShreeShanidham/
Like &By Daati Maharaj| 0 views
You Become What You Think | Change Your Thought Change Your Life
Welcome to our latest video, "You Become What You Think" In this inspiring journey, we delve into the powerful philosophy that our thoughts shape our reality. Through a series of enlightening stories, expert interviews, and practical tips, we explore how positive thinking can transform your life.
What to Expect:
Inspirational Stories: Hear from individuals who have dramatically changed their lives through positive thinking.
Expert Insights: Learn from psychologists and motivational speakers about the science and psychology behind this concept.
Practical Tips: Get actionable advice on how to incorporate positive thinking into your daily routine.
???? Why Watch:
Boost Your Motivation: Feel empowered to tackle your goals with a new mindset.
Transform Your Perspective: Learn how to shift your thinking patterns for a happier, more fulfilled life.
Join a Community: Connect with like-minded individuals in the comments who are on their own journey of self-improvement.
???? Don't forget to like, share, and subscribe for more content like this. Drop a comment below sharing how positive thinking has influenced your life!
हमारे नवीनतम वीडियो "आप वही बनते हैं जो आप सोचते हैं" में आपका स्वागत है! ????इस प्रेरणादायक यात्रा में, हम उस शक्तिशाली दर्शन की गहराई में जाते हैं कि हमारे विचार हमारी वास्तविकता को आकार देते हैं। प्रेरक कहानियों, विशेषज्ञों के साक्षात्कार, और व्यावहारिक सुझावों के माध्यम से, हम यह खोजते हैं कि सकारात्मक सोच कैसे आपके जीवन को परिवर्तित कर सकती है।
#positivemindset #personalgrowth #inspirationaljourneys #mindsetmatters #thinkpositive #lifetransformation #selfimprovement #motivationdaily #youarewhatyouthink #youtubecommunity
#sciencedivine
#sakshishree #spirituality #motivation #meditation #inspirational #motivational #inspiration #spiritual #guru
संबुद्ध सद्गुरु साक्षी श्री आपके जीवन की प्रमुख समस्याओं को बिना बताए स्वयं ही लिख देतेBy Sadguru Sakshi Ram Kripal Ji| 0 views
Launch of Gujarat Election Campaign in Ahmedabad
Launch of Gujarat Election Campaign in Ahmedabad.
#CongressNuKaamBoleChe
Declaration:
This video is an intellectual property belonging to the Indian National Congress. Please seek prior permission before using any part of this video in any form.
For more videos, subscribe to Congress Party channel: https://www.youtube.com/user/indiacongress
Follow Indian National Congress!
Follow the Indian National Congress on
Facebook: https://www.facebook.com/IndianNationalCongress
Twitter:https://twitter.com/INCIndia
Instagram: https://www.instagram.com/incindia/
YouTube: https://www.youtube.com/user/indiacongress
Follow Rahul Gandhi on
YouTube: https://www.youtube.com/c/rahulgandhi/
Facebook: https://www.facebook.com/rahulgandhi/
Twitter: https://twitter.com/rahulgandhi/
Instagram: https://www.instagram.com/rahulgandhi/
Launch of Gujarat Election Campaign in AhmedabadBy Indian National Congress| 170472 views
Amit Shah के बयान पर Congress ने किया पलटवार | Randeep Singh Surjewala | Madhya Pradesh | #dblive
Amit Shah के बयान पर Congress ने किया पलटवार | Randeep Singh Surjewala | Madhya Pradesh | #dblive
#HindiNews | #BreakingNews | #Watch | #video |
Get paid membership : https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw/join
DB LIVE APP : https://play.google.com/store/apps/details?id=dblive.tv.news.dblivetv.com
DB LIVE TV : http://dblive.tv/
SUBSCRIBE TO OUR CHANNEL: https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw
DESHBANDHU : http://www.deshbandhu.co.in/
FACEBOOK : https://www.facebook.com/DBlivenews/
TWITTER : https://twitter.com/dblive15
ENTERTAINMENT LIVE : https://www.youtube.com/channel/UCyX4qQhpz8WQP2Iu7jzHGFQ
Sports Live : https://www.youtube.com/channel/UCHgCkbxlMRgMrjUtvMmBojg
Amit Shah के बयान पर Congress ने किया पलटवार | Randeep Singh Surjewala | Madhya Pradesh | #dbliveBy DB Live| 41 views
Bikaner News | लोकसभा चुनाव को लेकर कांग्रेस की तैयारी, कार्यकर्ताओ से पार्टी प्रभारी ने की चर्चा
#bikanernews #preparations #loksabhaelections #partyincharge #discussed #latestnews #breakingnews #news
Watch JAN TV on :
Tata Play DTH : 1185
Airtel DTH: 355
JIO Fiber: 1384
https://www.youtube.com/jantvindia/live
Make sure you subscribe to our channel and never miss a new video:
https://www.youtube.com/jantvindia
https://www.facebook.com/jantvindia
https://www.instagram.com/jantvindia/
https://twitter.com/JANTV2012
http://www.jantv.in
Jan TV Live | Hindi News LIVE 24X7 | Jan TV Live | Hindi news 24X7 LIVE
Jan TV | Hindi News Jan TV Live | Jan TV News | Jan TV Live
News Credit -VKJ
Bikaner News | लोकसभा चुनाव को लेकर कांग्रेस की तैयारी, कार्यकर्ताओ से पार्टी प्रभारी ने की चर्चाBy JANTV RAJASTHAN| 0 views
Saiyami Kher on Ghoomer | Exclusive Interview | Crictracker
Saiyami Kher on Ghoomer | Exclusive Interview | Crictracker
The talented and gorgeous Saiyami Kher, who is making waves with her latest film Ghoomer. Plays the role of Anina Dixit, a cricketer who loses her right hand in an accident and makes a comeback as a one-handed bowler. The film, directed by R Balki and co-starring Abhishek Bachchan, has received rave reviews from critics and audiences alike.
Saiyami talks about her experience of working on Ghoomer, her preparation for the role, her passion for cricket, her friendship with Sachin Tendulkar and Rohit Sharma, and much more. She will also reveal some interesting facts about her personal and professional life, such as how she started modelling, why she turned down Zoya Akhtar's offer for Luck By Chance, how she impressed Roger Federer with her tennis skills, and what are her future projects.
Don't miss this candid and fun conversation with Saiyami Kher, who is not only a brilliant actor but also a sports enthusiast. Watch the video till the end and don't forget to like, share and subscribe for more such videos.
Stay tuned to Crictracker for more cricket updates, and don't forget to like, share, and subscribe to our channel.
#cricket #cricketnews #cricketvideo #crictracker
Follow us on:
Website - https://www.crictracker.com
Facebook - https://www.facebook.com/crictracker
Instagram - https://www.instagram.com/crictracker
Twitter - https://www.twitter.com/cricketracker
LinkedIn - https://www.linkedin.com/company/crictracker
Telegram - https://ttttt.me/crictracker
Saiyami Kher on Ghoomer | Exclusive Interview | CrictrackerBy CricTracker| 443 views
India - USA Trade Statistics
Comparative Trade Statistics for the Years 2013 & 2014
(Top 25 Products)Watch India - USA Trade Statistics With HD QualityBy Indian Trade Portal| 467412 views
Special Briefing on the Visit of President of Maldives to India (August 02, 2022)
Special Briefing on the Visit of President of Maldives to India (August 02, 2022)By Ministry of External Affairs, India| 194307 views